Qty :
...बोफोर्ससारख्या प्रकरणांचा जन्म इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत झाला. पुढे काँग्रेस पक्षाला पैसे मिळवून देण्यासाठी संजय गांधी यांनी हे तंत्र पाहिजे तसे सुधारले... ...राजीव गांधी यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही बोफोर्स प्रकरणामध्ये दलाली, कमिशन अथवा पैसे घेतले नाहीत. पण तरीही परिस्थितीजन्य पुरावे हेच दर्शवितात की, दलाली घेतलेल्यांची नावे त्यांना ठाऊक होती आणि ती नावे उघड करण्यास ते नाखूष होते. कदाचित ती नावे काँग्रेस पक्षातील व्यक्तींची असतील, जवळच्या नातेवाईकांची किंवा मित्रांचीही असतील. ही नावे त्यांना बोफोर्सचा करार पक्का होण्यापूर्वी कळली होती की, करार झाल्यानंतर कळली होती? ...शिक्षणसंस्था, सैन्य, निमलष्करी दले आणि सरकारी नोक-यांतील बढत्या येथे आरक्षणाचे धोरण राबवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी दिले होते. पण तरीही आरक्षणविरोधी भावना शमली नाही. ....लटपट्या व भोंदू तांत्रिक चंद्रास्वामी हा भारतात आज रात्री परतत आहे, ही बातमी महसूल सचिव मिश्रा यांनी पंतप्रधान चंद्रशेखर यांना दिली. परंतु या बातमीमुळे त्यांना फारसा आनंद झालेला दिसत नव्हता, म्हणून मी असा तर्क काढला की, आता ही बातमी चंद्रास्वामी यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मग ते भारतात परतण्याचे नक्की रहित करतील. अन् शेवटी तसेच झाले. आता मिश्रा यांची लवकरच बदली होणार हे मी हेरले.
...बोफोर्ससारख्या प्रकरणांचा जन्म इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत झाला. पुढे काँग्रेस पक्षाला पैसे मिळवून देण्यासाठी संजय गांधी यांनी हे तंत्र पाहिजे तसे सुधारले... ...राजीव गांधी यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही बोफोर्स प्रकरणामध्ये दलाली, कमिशन अथवा पैसे घेतले नाहीत. पण तरीही परिस्थितीजन्य पुरावे हेच दर्शवितात की, दलाली घेतलेल्यांची नावे त्यांना ठाऊक होती आणि ती नावे उघड करण्यास ते नाखूष होते. कदाचित ती नावे काँग्रेस पक्षातील व्यक्तींची असतील, जवळच्या नातेवाईकांची किंवा मित्रांचीही असतील. ही नावे त्यांना बोफोर्सचा करार पक्का होण्यापूर्वी कळली होती की, करार झाल्यानंतर कळली होती? ...शिक्षणसंस्था, सैन्य, निमलष्करी दले आणि सरकारी नोक-यांतील बढत्या येथे आरक्षणाचे धोरण राबवले जाणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी दिले होते. पण तरीही आरक्षणविरोधी भावना शमली नाही. ....लटपट्या व भोंदू तांत्रिक चंद्रास्वामी हा भारतात आज रात्री परतत आहे, ही बातमी महसूल सचिव मिश्रा यांनी पंतप्रधान चंद्रशेखर यांना दिली. परंतु या बातमीमुळे त्यांना फारसा आनंद झालेला दिसत नव्हता, म्हणून मी असा तर्क काढला की, आता ही बातमी चंद्रास्वामी यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मग ते भारतात परतण्याचे नक्की रहित करतील. अन् शेवटी तसेच झाले. आता मिश्रा यांची लवकरच बदली होणार हे मी हेरले.
Publication | मेहता पुब्लीशिंग हाउस |
ISBN | 8177667157 |
Binding | |
No.Of.Pages | 504 |